पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापत काढत सांबा आणि जम्मू जिल्ह्य़ात सीमेवरील चौक्यांवर मध्यरात्री व पहाटे गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
रामगढ व अर्निया क्षेत्रांत पाकिस्तानने गोळीबार केला. त्याला सीमा सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबारात कोणीतीही जीवित हानी झाली नसल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. बुधवारपासून पाकिस्तानने तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास नरिनपूर येथे पाकिस्तानने गोळीबार केला होता. या महिन्यातपाकिस्तानच्या गोळीबारात १३ जवानांसह ९५ नागरिक जखमी झाले.