बॉलीवूडकडे पैसा आहे. गेल्या काही वर्षांत हॉलीवूडच्या मोठय़ा स्टुडिओजनी हिंदी चित्रपटांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. आपल्याकडे खूप चांगले कलाकार आहेत आणि नव्या विचारांचे दिग्दर्शकही आहेत. तरीही हॉलीवूडच्या तुलनेत आपले चित्रपट फारच मागे आहेत, हे चित्र दिसते. गेली अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय चित्रपटनिर्मितीचा अनुभव गाठीशी असणाऱ्या निर्मात्या भावना तलवार यांच्या मते ‘पटकथे’चा अभाव हेच बॉलीवूडच्या अपयशाचे कारण आहे.
चित्रपटनिर्मितीची गणितं सर्रास बदलत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीत आता आलेली नव्या दिग्दर्शकांची rv01लाट ही बॉलीवूडमध्ये बदल करणारी ठरली आहे. पण, अजूनही काही अपवाद वगळता बॉलीवूडने आपली रुळलेली वाट सोडलेली नाही. अशा वेळी हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटनिर्मितीचा अनुभव असणाऱ्या भावना तलवार यांना बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये आर्थिक तफावतीचे कारण अजिबात पटत नाही. युकेसाठी ‘जेनेसिस’ या साय-फाय थरारपटाची निर्मिती करत आहेत. साय-फाय थरारपटांची निर्मिती हे मोठं आव्हान असतं. मात्र, ‘जेनेसिस’चा विषय आपल्याला फार आवडला होता, असं शीतल तलवार यांनी सांगितलं. माणसांनी तयार केलेली यंत्रं त्यांच्यावरच उलटतात तेव्हा काय होतं हा विषय हॉलीवूडपटांमधून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे. ‘जेनेसिस’ हा अगदी आत्ताच्या काळाशी सुसंगत अशी या विषयाची मांडणी करतो, असं त्यांनी सांगितलं. ‘जेनेसिस’सारख्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी हात पुढे करणाऱ्या भावना तलवार यांना हिंदीत अशा चित्रपटांची निर्मिती rv02करावीशी वाटत नाही का?, असा प्रश्न विचारल्यावर मुळात हिंदीत असे विषय घेऊन कोणी पुढे येतच नाही, असं त्यांनी सांगितलं. ‘जेनेसिस’सारखा साय-फाय पट असेल नाहीतर पूर्णपणे हिंदी महासागरात पाण्याखाली चित्रित करण्यात आलेली ‘अ लाइफ अंडर वॉटर’सारखा अनुबोधपट असेल, त्यांच्या पटकथेवर तपशीलवार काम के लेलं असतं. मला माझ्या कथेतून काही तरी सांगायचं आहे, मांडायचं आहे हेच मुळी हिंदी चित्रपटसृष्टीत मनावर घेतलं जात नाही. पटकथेवर काम करणारे किती दिग्दर्शक आहेत? फार कमी दिग्दर्शक आहेत जे सशक्त पटकथा असल्याशिवाय चित्रपट करत नाहीत. हॉलीवूडमध्ये बिग बजेट चित्रपट असेल किंवा अगदी कमी बजेट असलेला चित्रपट असेल, त्यांच्याकडे ‘कथे’ला फार महत्त्व आहे, असं भावना तलवार यांनी सांगितलं.

हॉलीवूडचे तंत्रज्ञान आपल्यापेक्षा फार प्रगत
आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट करताना आणि हिंदीत काम करताना एकच गोष्ट प्रामुख्याने जाणवते ते म्हणजे पटकथेपासून ते पोस्ट प्रॉडक्शनपर्यंत तिथे तपशीलवार काम के लं जातं. बाकी सिनेमानिर्मितीची प्रक्रिया ही दोन्हीकडे सारखीच असते, असं त्यांनी सांगितलं. ‘फास्ट अँड फ्युरिअस’सारख्या चित्रपटात काम के लेल्या बॉलीवूड अभिनेता अली फजल याच्या मते हॉलीवूडचे चित्रपटनिर्मितीचे तंत्रज्ञान हे आपल्यापेक्षा फार प्रगत आहे. कुठल्याही जॉनरचा चित्रपट असेल त्यासाठी हॉलीवूडमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान आपल्याकडच्या चित्रपटांपेक्षा वेगळे असल्याचे त्याने सांगितले. मात्र, हॉलीवूडपटांच्या कथा या आपल्याकडच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या असतात, हेही तो मान्य करतो. पण, आत्ता हिंदी चित्रपटसृष्टीत असलेले दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमाची मांडणी करत आहेत. वेगळ्या कथा मांडण्याचा, वेगळे जॉनर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि प्रेक्षकांचाही त्यांना प्रतिसाद मिळतो आहे, असं मत अलीने व्यक्त केलं.